लोककला, साहित्य यांचा स्वतंत्र वारस असलेल्या कोकणाला विशेषत: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्य़ांना लाभलेला समुद्रकिनारा, हिरव्या माडाच्या बागा, सुंदर खाडय़ा, जलदुर्ग, समुद्रतीरावरील देवालये पाहताना मन भारवून जाते. समुद्रसफरीत होणाऱ्या
डॉल्फिन-दर्शनामुळे हा आनंद द्विगुणित होतो. शिवाय इथल्या खास मालवणी
जेवणाची चव जिभेवर रेंगाळत राहते, ती वेगळीच! उन्हाळ्याची सुट्टी
जवळ आली असताना येथील पर्यटन स्थळे आपल्याला माहीत झाल्यास कोकण पर्यटनाचा
मनमुराद आनंद आपल्याला घेता येईल.
सिंधुदुर्गमधील
देवगड, मालवण आणि वेंगुर्ला हे तीन तालुके समुद्रकिनाऱ्यावर आहेत. तीनही
तालुक्यांची स्वतंत्र ओळख आहे. देवगड व वेंगुर्ला हापूस आंबा उत्पादनासाठी
प्रसिद्ध आहेत.
गडदेव
विजयदुर्ग किल्ला व बीच : विजयदुर्ग हे प्रसिद्ध बंदर आहे.
येथील समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला किल्ला मराठी आरमाराचे केंद्रस्थान
म्हणून ओळखला जातो. ८०० वर्षांपूर्वी राजा भोज याने हा किल्ला उभारला.
शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केली. सुमारे सतरा एकर क्षेत्रात हा
किल्ला आहे. इथे वीस बुरुज, देवतांची मंदिरे, तोफगोळे पाहायला मिळतात. वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेला हा किल्ला
इतिहासप्रेमींना साद घालतो. किल्ल्यावरून समुद्र न्याहाळताना मन प्रफुल्लित
होते. समुद्रातील तटावरून डॉल्फिन-दर्शन घेता येते. बाजूलाच सुंदर विजयदुर्ग
बीच आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तरळे येथून विजयदुर्गला जाणारा ५२ कि.
मी.चा मार्ग आहे. वाटेत वाघोटन, पडेल ही गावं लागतात. विजयदुर्ग
देवगडवरून २७ कि. मी. अंतरावर आहे.
नजीकचे
रेल्वे स्टेशन : वैभववाडी रोड (०२३६७) २३७२५३
राहण्यासाठी
: हॉटेल सुरुची (०२३६४) २४५३३५.
देवगड
येथील
देवगड किल्ला, बंदर, पवनचक्की व देवगड बीच सौंदर्यात भर पाडत आहेत. इ. स. १७०५ साली कान्होजी
आंग्रे यांनी किल्ल्याचे बांधकाम केले. देवगड बंदर वाहतुकीसाठी बंद असून
मच्छिमार आपल्या नौका येथे लावतात. सुरक्षित नैसर्गिक बंदर अशी याची ओळख
आहे. देशातली पहिली पवनऊर्जा निर्मिती करणारी पवनचक्की येथे पाहता येते.
देवगड बीच फारच सुंदर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव येथून ३८
कि.मी. अंतरावर आहे, तर कणकवलीवरून ५३ कि.
मी. अंतर
आहे. वाटेत शिरगाव, तळेबाजार, जामसंडे ही गावे लागतात.
नजीकचे
रेल्वेस्टेशन : कणकवली, संपर्क ०२३६७-२३२२४३
राहण्यासाठी
: हॉटेल रंगोली ९४२२४३६२७८; हॉटेल ग्रीन व्हिला गेस्ट हाऊस
०२३६४-२६२५४०; हॉटेल पारिजात ०२३६४-२६२३०२.
कुणकेश्वर मंदिर
स्थापत्य
कलेचा उत्तम नमुना व समुद्रकिनाऱ्यावरील जागृत देवस्थान अशी कुणकेश्वरची ओळख
आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. हे तीर्थक्षेत्र म्हणून परिचित
आहे. देवगडपासून १४ कि. मी. अंतरावर असलेल्या कुणकेश्वरच्या आजूबाजूलाही
सुंदर बीच आहेत. येथून ३ कि. मी. अंतरावर तांबळडेग बीच आहे. पांढऱ्याशुभ्र
वाळूचा किनारा व माडा-पोफळीच्या बागा येथे पाहायला मिळतात.
राहण्यासाठी
: कुणकेश्वर भक्तनिवास ०२३६४-२४८६५०, २४८७५०
मालवण
जवळचे
रेल्वे स्थानक : सिंधुदुर्ग, कणकवली- ०२३८७-२३२२४३
राहण्यासाठी
: हॉटेल सागरकिनारा ०२३६५-२५२२६४; लॉज स्वस्तिक ०२३६५-२५२४२७;
ओटवणेकर
हॉलिडे होम ०२३६५-२५२१८८.
तारकर्ली
समुद्री
पर्यटनात या बीचने जागतिक नकाशावर स्थान मिळविले आहे. संपूर्ण किनाऱ्यावर
वीजप्रकाशाची व्यवस्था आहे. पर्यटन विकास महामंडळाने तंबू निवासाची व्यवस्था
केली आहे. हाऊसबोट व स्पीड बोटीतून येथे समुद्रात सफर करता येते. मालवणपासून
६ कि.मी. अंतर आहे. येथून ४ कि.मी.वर सुंदर माडा-पोफळीच्या बागांतील ‘देवबाग’ पाहता येते. अरबी
समुद्र व
कर्ली नदीच्या संगमावरील देवबाग फिरताना फारच सुंदर वाटते.
राहण्याची
सुविधा :
MTDC बांबू हाऊस
आणि टेण्ट रिसॉर्ट ०२३६५-२५२३९०;
घर
मिठबांवकरांचे ०२३६५-२५२९४१;
सागर दर्शन
(देवबाग) ०२३६५-२४८४१४; सुमती रिसॉर्ट ०२३६५-२४८५४३.
स्नॉर्कलिंग, डॉल्फीनदर्शन व हाऊसबोट
मालवणमध्ये
एमटीडीसीने स्नॉर्कलिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. मालवण जेटीजवळ याचे
बुकिंग होते. किल्ल्याच्या मागील बाजूला खोल समुद्रातील सौंदर्य पर्यटकांना
दाखवले जाते. मालवणमध्ये समुद्रसफर करताना तारकर्ली, देवबाग इथे सायंकाळी डॉल्फीनदर्शन होते; तारकर्लीच्या
खाडीत हाऊस बोटिंगचा प्रकल्प एमटीडीसीने सुरू केला आहे. याचे बुकिंग
एमटीडीसीच्या तारकर्ली पर्यटन निवास केंद्रात होते.
स्नॉर्कलिंगसाठी
संपर्क :
अंतोन
फर्नाडिस ९९६०४६८६३८;
यतीन मेयर
९९७५५५६४२८;
एमटीडीसी
(०२३६५) २५२३९०.
वेंगुर्ले
भोगवे बीच :
सिंधुदुर्गातील
सर्वात सुंदर व डॉल्फिनदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या या बीचवर खाजगी
होडय़ांतून समुद्रसफर करता येते. समुद्र पक्ष्यांचे थवे येथे असतात.
वेंगुर्लेपासून ३४ कि.मी. तर कुडाळवरून ३० कि.मी.वर भोगवे आहे.
वेंगुर्लेवरून म्हापनमार्गे तर कुडाळवरून वालावलमार्गे जायला मार्ग आहे.
जवळचे
रेल्वे स्टेशन :
कुडाळ-
०२३६२- २२२६०४
राहण्यासाठी
हॉटेल सागरदर्शन : ०२३६६- २६९५७०
सागरेश्वर बीच :
वेंगुर्लेपासून
अवघ्या तीन कि.मी. वर हा बीच आहे. येथे सागरेश्वर देवाचे सुंदर मंदिर आहे.
येथून वेंगुर्ले बंदराचे विहंगम दृश्य
पाहता येते.
डॉल्फिनदर्शनासाठी हा किनारा प्रसिद्ध आहे.
निवती बीच
:
वेंगुर्लेपासून
२८ कि.मी.वर असलेला हा बीच डॉल्फिनदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांना
समुद्रात २ ते ३ कि.मी. आत नेऊन डॉल्फिनदर्शन घडवले जाते. सर्वात मोठय़ा
संख्येने येथे डॉल्फिन असतात. येथे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी
पाहायला मिळते. येथे निवास व न्याहरी योजना केंद्र आहे.
संपर्क : दिगंबर केसरकर ०२३६६-२८०८१२.
रेडी आणि यशवंतगड
रेडी येथील
गणपती मंदिर व यशवंतगड- येथील गणपतीमंदिरात दोन हात असलेली गणेशमूर्ती आहे.
समुद्रकिनाऱ्याजवळील हे मंदिर धार्मिक पर्यटनस्थळ आहे. येथून जवळच रेडी
खाडीमुखाजवळ यशवंतगड आहे. १६व्या शतकात हा किल्ला शिवाजी महाराजांनी
विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला. वेंगुर्लेपासून ही ठिकाणे २८ कि.मी.
तर सावंतवाडीपासून ३५ कि.मी. वर आहेत. येथे निवासाची व्यवस्था नाही.
नजीकचे
रेल्वे स्थानक- सावंतवाडी.
वेंगुर्लेमधील
निवास व्यवस्था :
हॉटेल
सीव्ह्यूव ०२३६६-२६२४७०;
हॉटेल
बांबू ०२३६६- २६२२५१;
खंडे
कॉर्नर ०२३६६-२६२४९८
सिंधुदुर्गात आजही व्हर्जिन बीच पाहायला मिळतात. निसर्गसौंदर्य जसेच्या
तसे येथे जोपासलेले आहे. परंतु सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा होऊन १० वर्षे
उलटल्यानंतरही पायाभूत सुविधा नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे.
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात फारशी पर्यटनाच्या दृष्टीने डेव्हलपमेंट झाली नसली
तरी येथील समुद्रकिनारेही सिंधुदुर्गाप्रमाणेच सुंदर आहेत. गणपतीपुळे हे
धार्मिक पर्यटनस्थळ फार वर्षांपासून प्रसिद्ध आहे.
गणपतीपुळे
:
प्राचीन
कलाकुसरीतील मंदिर व सुंदर मूर्ती असलेले हे ठिकाण फारच सुंदर आहे. लांबच
लांब समुद्रकिनारा हे येथील वैशिष्टय़ आहे. वॉटर स्कूटर, मोटर, पॅडल बोट, बोटिंग या सुविधा एमटीडीसीने येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबई-गोवा
महामार्गावरील हातखांबा येथून रत्नागिरीमार्गे गणपतीपुळेला जायला सुमारे ४०
कि.मी.चा मार्ग आहे.
जवळचे
स्टेशन : रत्नागिरी.
राहण्याची
व्यवस्था : एमटीडीसी तंबू निवास.
संपर्क : ०२३५७- २३५२४८.
आंबुळगड
निसर्गरम्य
समुद्रकिनारा असलेले हे एक पर्यटनस्थळ असून रत्नागिरीहून ६० कि.मी. वर आहे.
पावसमार्गे- नाटेहून येथे जावे लागते.
राहण्यासाठी
:
समुद्र बीच
हाऊस ९८९२२०८६८७.
नाटे
रत्नागिरीहून
५५ कि.मी. अंतरावरील या बीचवर पावसमार्गे जावे लागते. या ठिकाणी राहण्याची व
जेवणाची सुंदर व्यवस्था आहे. अॅग्रो टुरीझमची संकल्पना गणेश रानडे यांनी
राबवून कोकणी पद्धतीची राहण्याची व्यवस्था समुद्रकिनारीच केली आहे.
संपर्क : गणेश रानडे ९४२२४३३६७६, ०२३५३-२२५५३६.
भगवती किल्ला :
रत्नागिरीहून
१ कि.मी.वर समुद्रकिनारी हा किल्ला आहे. किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम
दृश्य न्याहाळता येते. येथे जवळच रत्नागिरी बंदरही आहे.
रत्नागिरी
येथून २० कि.मी. वरील आरेवारे पूल प्रसिद्ध ठिकाण आहे. खाडीवरील या
पुलानजीकचा किनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो.
|
No comments:
Post a Comment